best news portal development company in india

गोदावरी उजव्या तट कालव्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याला विरोध..”आता नाही तर……कधी च नाही…..”नाहीतर जमिन कोरडवाहू होऊन शेतकरी रस्त्यावर पडतील…

SHARE:

पत्रकार:भाऊसाहेब हांडोरे, “ए वन न्यूज महाराष्ट्र” ,सिन्नर————————————————————————————————————————-

       नांदूर मधमेश्वर उजवा तट कालवा वर सिन्नर तालुक्यातील मेंढी येथे चालू असलेले विस्तारीकरणाचे काम व कॉंक्रिटीकरण नाला विरोध करून आज काम बंद पाडले…

  सिन्नर: तालुक्यातील चोंढी व सांगवी मधून पाटाच्या आस्तारिकरणाला विरोध लक्षात घेऊन ठेकेदाराला त्याचा ढंपर व जे.सी.बी घेऊन पलायन केले असून संबंधित ठेकेदाराने काढता पाय घेतला…


  गोदावरी उजव्या तट कालव्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचा जो घाट घातला जात आहे. त्याला सिन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे… सध्या या कामाला सुरुवात झाली होती… परंतु शेतकरी व विविध सामाजिक संघटना यांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

आता नाही तर… ….    कधी च नाही . ” त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या भाजपा चे कार्यकर्ते यांनी सुद्धा या कामाला विरोध करतांना दिसत आहे.. हा कालवा सिन्नर तालुक्यातील जवळपास दहा बारा गावातील कार्यक्षेत्रातुन जात असल्याने शेकडो एकर जमीन ओलिताखाली येते परंतु सिमेंट कॉंक्रीटीकरण झाल्यावर या सर्व शेतकऱ्यांना याचा फटका बसणार असून जमिन कोरडवाहू होऊन शेतकरी रस्त्यावर पडतील अशी भिती निर्माण होईल. अशी भावना व्यक्त होत आहेत.. त्यामुळे या कामाला विरोध करतांना कुठल्याही प्रकारची तडजोड न करता  भविष्याचा विचार करून या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत संबंधित गावातील ग्रामपंचायतीने ठराव करून सरकारला सादर करून आपला विरोध दर्शवा व आपली बागायती शेती वाचवावी असे आव्हान जाणकार शेतकऱ्यांनी केलं आहे.

    त्यामध्ये भारतीय जनता पार्टी सिन्नर  तालुकाध्यक्ष कानिफनाथ घुमरे,विजय घुमरे,सचिन गीते,अशोक मवाळ,रविराज घुमरे,धनंजय जगताप व इतर कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला तरी परिसरातील सर्व शेतकरी बंधूंना सूचित करतो की प्रत्येक गावातून ह्या कामाला प्रचंड विरोध झाला पाहिजे,आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई