प्रतिनिधी: भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुक्यात सर्वत्र रस्त्यांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरू असला, तरी हा विकास केवळ निवडणुकीपुरता फार्स ठरू नये, अशी ठाम भूमिका नायगाव–जायगाव परिसरातील ग्रामस्थांनी घेतली आहे. “काम सुरू करण्यापूर्वी निधीची शाश्वती द्या; अन्यथा नव्या कामांचा शुभारंभ करू नका,” अशी मागणी करत ग्रामस्थांनी लाक्षणिक आंदोलन छेडले.
ग्रामस्थांच्या मते, दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली काही रस्त्यांची कामे आजही अपूर्ण अवस्थेत आहेत. निधीअभावी कामे रखडल्याने नागरिकांना खड्डेमय, अर्धवट रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळीचे लोट—अशा परिस्थितीत नव्या कामांचे भूमिपूजन केल्याने शंका उपस्थित होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, शासनाने निधी वेळेवर न दिल्यास संबंधित ठेकेदारांनी काम पूर्ण करण्याची हमी द्यावी. अन्यथा अशा ठेकेदारांना काम देऊ नये. “निधीची स्पष्ट तरतूद आणि काम पूर्णत्वाची वेळमर्यादा जाहीर करा,” अशी मागणी करण्यात आली. जनतेची दिशाभूल थांबवावी आणि विकासकामांमध्ये पारदर्शकता ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले.
आंदोलन शमवण्यासाठी संबंधित खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लेखी आश्वासन देत कामे पूर्ण करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडल्याचे सांगितले जाते. मात्र मीडियासमोर अधिकृत प्रतिक्रिया देण्याची वेळ आल्यावर अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
“जर सर्व काही नियमानुसार असेल, तर मीडियासमोर येण्यास भीती कशाची?” असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. लेखी आश्वासन दिले असले तरी सार्वजनिकरित्या स्पष्ट भूमिका न मांडल्याने आश्वासनांच्या अंमलबजावणीबाबत शंका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या कामांकडे नागरिक साशंक नजरेने पाहत आहेत. विकासकामे केवळ भूमिपूजनापुरती मर्यादित राहू नयेत; तर दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत, हीच जनतेची अपेक्षा आहे.
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर रखडलेली कामे पूर्ण झाली नाहीत आणि निधीबाबत स्पष्टता दिली नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
नायगाव–जायगाव परिसरातील रस्त्यांचा प्रश्न आता केवळ विकासाचा न राहता प्रशासनाच्या विश्वासार्हतेची कसोटी ठरत आहे. निवडणूकपूर्व धडाकेबाज घोषणांपलीकडे प्रत्यक्षात किती काम पूर्ण होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




