best news portal development company in india

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांग क्रांती संघटनेचा विविध मागण्यांसाठी मोर्चा….

SHARE:

 

 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त नासिक जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांग क्रांती संघटनेनचे विविध मागण्यांसाठी “भीक मागो आंदोलन”…

     नाशिक:- 26 जनवरी प्रजासत्ताक दिन या दिवशी सर्वांना आपल्या सत्तेचा वापर कसा करावा आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आणि संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. परंतु दिव्यांग बांधवांसाठी हा दिवस आज त्यांनी त्यांच्या मागणीसाठी आंदोलन उभे करून साजरा केला नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयवर हजारो दिव्यांग बांधव एकत्रित जमा होऊन जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांच्या निवेदन देऊन सरकारकडे आपली मागणी मागण्याचं भिक मागत होते. दिव्यांगांचे कैवारी बच्चुभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर दिव्यांगांच्या आंदोलन उभे करण्याचे ठरवले प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालया वरती दिव्यांग आणि आंदोलन उभे करावी असे आदेश बच्चुभाऊ कडू यांनी दिले याच धर्तीवर संपूर्ण संपूर्ण जिल्ह्यात असे आंदोलन उभे करण्यात आले नाशिक जिल्ह्यातही हे आंदोलन भव्य दिव्य स्वरूपात झाले हजारो दिव्यांग एकत्रित जमा होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट वरती सर्व एकत्र येऊन घोषणाबाजी करू लागले जिल्हाधिकारी जलष शर्मा यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली दिव्यांगांच्या खालील प्रमाणे मागणी आहेत.
1 . राज्यातील दिब्यांगांना प्रती महिना 6000 रूपये पेंशन तातडीने लागूकरण्यत यावी- 
2. राज्यात प्रत्येक सुसज्ज अशा दिव्यांगभवन ची निर्मित करण्यात यावी. योग्यता एसटी महामंडळ लगतची जागा देण्यात यावी.जी दीव्यांग व्यक्ती जिल्ह्याच्या ठिकाणी एसटी प्रवास करून आल्यानंतर आपल्याला दिव्यांग भावनातील प्रशासकीय कामाकरिता शहरात दूरवर जाण्याचा त्रास होणार नाही.
 3) राज्यातील मूकबधिर बांधवांना  आर.टी. ओ. परिवहन विभागा कडून गाडी चलवणाचे परवाना तातडीने देण्यात यावा, तसेच नोकरीव्यवसाय व खाजगी नोकरी मध्ये प्राधान्य द्यावे. राज्यातील एमआयडीसी खाजगी संस्था मध्ये दिव्यांगांनाव मूकबधिरांना नोकरीमध्ये चार टक्के रोजगार उपलब्ध देणे.
5} दिव्यांग शासन निर्णय नुसार अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा.
 6)राज्यातील मूकबधिर बांधव यांना महाविद्यालय व शिक्षणाची तातडीने उपाययोजना करण्यात यावी.
8) दिव्या गणपत संपूर्ण राज्यात फिरते विक्री केंद्र दिलेले आहेत ते वाहने अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे ती परत घेऊन चांगल्या कंपनीची वाहने तातडीने वाटप करण्यात यावे.
9) दिव्यांका कायदा 2016 नुसार प्रत्येक संस्था तसेच शासकीय विभाग आणि शासनाने 5% म्हणजे 25000 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पात दिव्य विभागासाठी करण्यात यावी.तसेच महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद दिव्यांग कल्याण सरकारी बँकेत खाते काढून त्यामध्ये 5% निधी वर्ग करण्यात यावी.याच खात्यामार्फत सर्व जमा खर्च करण्यात यावा, त्यामुळे भ्रष्टाचारावर आळा बसेल तसेच सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद यांच्याकडून अनुदान 5% टक्के निधी लवकर दिला जात नाही यावर रीतसर कारवाई करण्यात यावी.
10) दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता स्वाधार योजना तातडीने लागू करण्यात यावी.
11) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगारा करीता बेरोजगार दिव्यांग यांना स्टॉलचे वाटप करण्यात यावे..
12) दिव्यांग कल्याण विभाग स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठकीत सदर विभागाकडे 2063 पदी मंजूर करण्यात आलेली आहेत परंतु आज त्या व्यक्ती भरली गेलेली नाहीत ती तातडीने भरण्यात यावी.
13) शुभांगी दातांना विविध प्रशिक्षण करता बार्टी च्या धर्तीवर संत गाडगेबाबा दिव्यांग प्रशिक्षण संस्था तातडीने स्थापन करण्यात यावी.
14) राज्यांमध्ये दिव्यांगंना यूआयडी कार्ड दिव्यांग देण्यास खूप उशीर होत यावर तातडीने समिती नेमून सहकार्य करावे व राज्यांमध्ये ज्या दिवंगांची खोटी प्रमाणपत्र काढून बाद करण्यात यावी, प्रमाणपत्र खोटे देणाऱ्या सर्वाधिकारी व कर्मचाऱ्यांची फेर तपासणी करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
15) राज्यातील दिव्यांगांना. कौशल्य विकास स्थापना करण्यात यावी.
16) राज्यात विविध महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे यांना देखील शासनाच्या योजनेमध्ये लाभ देण्याबाबत.
17)दिव्यांगण राजकीय आरक्षण देण्याबाबत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका
18) राज्यात अनाथ मुलगा मुलींना एक टक्के आरक्षण लागू आहे परंतु अद्याप आर्थिक तरतूद करण्यात आली नाही याकरिता स्वतंत्र लेखाशीर्ष मिळत नाही याकरिता सामाजिक न्याय अथवा महिला बालविकास विभागापैकी कोणालाही जबाबदारी देण्यात यावी.
          अशा अनेक स्वरूपात दिव्यांग यांच्या मागण्या करता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात दिव्यांग बंधू उपस्थित राहून घोषणाबाजी करत होते.सुदृढ महिलांना लाडकी बहीण योजनेमार्फत पंधराशे रुपये महिना दिला जातो.परंतु या राज्यात ज्याला पाय नाही डोळे नाही हात नाही त्यांना कुठल्याही प्रकारे मदत दिली जात नाही हा मोठा भेदभाव या सरकारकडून होत आहे.दिव्यांगांचे भरपूर टक्के निधी हा दिला जात नाही सर्व निधी हा दुसऱ्या योजनांसाठी वापरला जातो, त्यामुळे राज्यात गरीब श्रीमंत गरीब दारी मोठी तयार झाली आहे. यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती प्रहार संघटनेने आंदोलन उभे केले,तसेच नाशिक जिल्ह्यात पाच हजारो दिव्यांग बांधव उपस्थित राहून आंदोलन छेडण्यात आले. 
   प्रहारचे जिल्हाप्रमुख गणेश भाऊ निंबाळकर, ललित पवार (जिल्हाध्यक्ष दिव्यांग).चंद्रभान गांगुर्डे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, दत्तू भाऊ बोडके, समाधान बागल जिल्हा सरचिटणीस,श्याम गोसावी शहर प्रमुख रवींद्र टिळे जिल्हाध्यक्ष अरुण पाचोरे जिल्हाध्यक्ष संध्याताई जाधव अरुण जाधव जे कप पिल्ले, बबलू मिर्झा नितीन गव्हाणे,सोमनाथ धुमाळ,गणपत नाने, संदीप आव्हाड, रुपेश परदेशी, संतोष मानकर ,सपान परदेशी ,फकीरा सूर्यवंशी ,अनिल भावसार, विलास कानटकर ,निलेश शिरसागर, सुभाष वाजे. तसेच  मोठ्या प्रमाणात प्रहार सैनिक उपस्थित होते.
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई