best news portal development company in india

भीषण अपघात! सावळघाटात दोन ट्रकांच्या कात्रीत इको कार; चार जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी…

SHARE:

प्रतिनिधी :ए वन न्युज महाराष्ट्र, नाशिक

नाशिक:मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सावळघाट परिसरात इको कार रस्त्यावरून जात असताना तिच्या पुढे एक ट्रक होता. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या ट्रकने इको कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे इको कार पुढील ट्रकवर आदळली आणि दोन्ही ट्रकांच्या कात्रीत अक्षरशः चिरडली गेली.

नाशिक–पेठ महामार्गावरील सावळघाट येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. दोन ट्रकांच्या मध्ये इको कार अडकल्याने झालेल्या या विचित्र अपघातात कारमधील चार जणांचा जागीच करुण मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की इको कारचा पूर्ण चक्काचूर झाला. कारमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मोठ्या प्रयत्नांनंतर कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या भीषण अपघातामुळे नाशिक–पेठ महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Aone News Maharashtra
सत्य • वेगवान • विश्वासार्ह

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई