best news portal development company in india

महाकौशलच्या रेल्वे विकासाला मिळणार मोठी गती! ‘वाराणसी–कन्याकुमारी काशी तमिळ संगमम एक्सप्रेस’ नव्या मार्गाने धावणार? रेल्वे बोर्डाकडे महत्त्वपूर्ण प्रस्ताव दाखल..!

SHARE:


विशेष प्रतिनिधी
महाकौशल/नागपूर; १६ मे २०२६:
उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना सांस्कृतिक, धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या जोडणारी अत्यंत महत्त्वाची ‘वाराणसी–कन्याकुमारी (काशी तमिळ संगमम) एक्सप्रेस’आता एका नव्या आणि अधिक प्रभावी मार्गाने धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाकौशल भागातील सक्रिय, समर्पित रेल्वे कार्यकर्ते अथर्व सिंह यांनी या संदर्भात रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाकडे एक औपचारिक जनहित प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावात सदर गाडीला नव्याने विकसित झालेल्या जबलपूर–नैनपूर–सिवनी–छिंदवाडा–नागपूर या मार्गावरून चालवण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.
अथर्व सिंह यांनी ३ मे २०२६ रोजी हा प्रस्ताव अधिकृतपणे सादर केला होता. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत या प्रस्तावाची नोंदणी क्रमांक MORLY/E/2026/0021131 अशी झाली आहे. सध्या हा प्रस्ताव ‘Grievance Received’ (तक्रार/निवेदन प्राप्त) या स्थितीत असून, रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (PG) श्री. रत्नेश कुमार झा यांच्या कार्यालयाकडून यावर अत्यंत गांभीर्याने प्रक्रिया व छाननी सुरू आहे.
     अथर्व सिंह हे गेल्या सात वर्षांपासून महाकौशल आणि मध्य भारतातील रेल्वे सुविधांचा विस्तार करण्यासाठी, नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि उपेक्षित रेल्वे मार्गांना राष्ट्रीय रेल्वे जाळ्याशी जोडण्यासाठी अथकपणे काम करत आहेत. त्यांच्या या नवीन प्रस्तावाचे मुख्य उद्दिष्ट नव्या कॉरिडॉरचा प्रभावी वापर:जबलपूर–नैनपूर–सिवनी–छिंदवाडा–नागपूर हा रेल्वे कॉरिडॉर पूर्णपणे विकसित आणि ब्रॉडगेज झाला असूनही सध्या येथे गाड्यांची संख्या अत्यंत नगण्य आहे. रेल्वे पायाभूत सुविधा उपलब्ध असूनही त्यांचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. या प्रस्तावामुळे रेल्वे संसाधनांचा समतोल आणि परिणामकारक वापर होईल.
तसेच आदिवासी व मागास भागांचा विकास: हा संपूर्ण मार्ग प्रामुख्याने आदिवासीबहुल आणि विकासाच्या दृष्टीने उपेक्षित आहे. येथील नागरिकांना अजूनही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पुरेशा रेल्वे सुविधा उपलब्ध नाहीत. या गाडीमुळे हा भाग थेट देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडला जाईल,असा आहे.

प्रस्तावित ‘काशी तमिळ संगमम एक्सप्रेस’चा नवा मार्ग हा  उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतातील प्रमुख धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिक केंद्रांना थेट जोडणारा असेल: या मध्ये वाराणसी (बनारस), प्रयागराज छेओकी, सतना, जबलपुर ,नैनपूर ,सिवनी ,छिंदवाडा ,नागपूर ,चंद्रपूर , विजयवाडा ,ओंगोले , रेनिगुंटा , तिरुचिरापल्ली ,मदुराई ,कन्याकुमारी. असा असेल…
  महाकौशल आणि मध्य भारतातील प्रवाशांना प्रयागराज, नागपूर, खंडवा, चेन्नई आणि कन्याकुमारी यांसारख्या प्रमुख शहरांशी थेट कनेक्टिव्हिटी मिळेल.
पैसा आणि वेळेची बचत गरजेची आहे म्हणून सध्या या मार्गावर थेट लांब पल्ल्याच्या गाड्यांचा अभाव असल्याने सामान्य नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि यात्रेकरूंना अनेक वेळा गाड्या बदलाव्या लागतात. त्यामुळे प्रवाशांचे मोठे आर्थिक नुकसान होते आणि वेळही वाया जातो. नवीन एक्सप्रेसमुळे या कटकटीतून कायमची सुटका होईल.
यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळेल,केंद्र सरकारच्या ‘काशी तमिळ संगमम’ या राष्ट्रीय उपक्रमाला या ट्रेनमुळे एक व्यावहारिक आणि मजबूत आधार मिळेल, ज्यामुळे उत्तर व दक्षिण भारतामधील सांस्कृतिक व धार्मिक संबंध अधिक दृढ होतील.
तसेच सर्वसमावेशक प्रादेशिक विकास या रेल्वेच्या संचालनामुळे जबलपूर, नैनपूर, सिवनी, छिंदवाडा आणि आसपासच्या दुर्गम भागातील नागरिकांना उच्च शिक्षण, अत्याधुनिक आरोग्य सुविधा, पर्यटन, व्यवसाय आणि रोजगाराच्या अभूतपूर्व संधी उपलब्ध होतील.
म्हणून देशभरातील रेल्वे प्रवाशांचे रेल्वे बोर्डाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
अथर्व सिंह यांनी आपल्या सविस्तर पत्रात लिहिले आहे की, जनतेच्या हितासाठी, प्रादेशिक संतुलित विकासासाठी आणि नवीन रेल्वे मार्गांच्या योग्य वापरासाठी या प्रस्तावाला त्वरित मंजुरी देणे अत्यंत आवश्यक आहे.
हा प्रस्ताव केवळ एका गाडीचा मार्ग बदलण्यापुरता मर्यादित नसून, तो राष्ट्रीय एकात्मता आणि उपेक्षित भागाच्या विकासाशी निगडित आहे. आता रेल्वे बोर्ड या जनहितार्थ मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन मध्य भारताला ही मोठी भेट कधी देणार, याकडे संपूर्ण देशातील रेल्वे प्रवाशांचे डोळे लागले आहेत.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई