best news portal development company in india

जळगावच्या पर्यटकांची बस नदीत कोसळली, 14 मृत्यू; अपघातग्रस्तांची नावे समोर – News18 मराठी

SHARE:

इम्तियाज अहमद, प्रतिनिधी
जळगाव : महाराष्ट्रातील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस नेपाळमध्ये नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमधून ४१ प्रवासी प्रवास करत होते. खोल दरीत कोसळलेल्या बसमधील १४ ते १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. तर ३० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

नेपाळला पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील प्रवासी काठमांडूच्या दिशेने जात असताना बस नदीत कोसळली. या अपघातात बसचा चक्काचूर झालाय. बसमधील १४ पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

News18

अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवासी भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव, पिंपळगाव, तळवेल या गावातले आहेत. हे 16 तारखेपासून अयोध्या नेपाळ इथं काठमांडू देवदर्शनासाठी गेले होते. 16 ते 28  ऑगस्टपर्यंत त्यांचा प्रवास ठरला होता. यासाठी त्यांनी दोन बसेस उत्तर प्रदेशातून बूक केल्या होत्या.

पोखराहून काठमांडूला निघालेल्या पर्यटकांची बस मुखलिसपूरजवळ दरीत कोसळली. गोरफूरच्या केसरवानी ट्रॅव्हल्समध्ये महाराष्ट्रातील ४१ प्रवासी होते. गोरखपूरच्या चालकासह १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रयागराज रेल्वे स्थानकाहून महाराष्ट्रातील ११० पर्यटकांचा ग्रुप चित्रकूटला गेला. तिथून अयोध्या, लुम्बिनी मार्गे ते नेपाळच्या पोखरा इथं पोहोचले. आज ते काठमांडूला निघाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई