best news portal development company in india

मोरे मौर्य क्रांती महासंघ च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय धनगर धर्म परिषदेचे आयोजन….

SHARE:

प्रतिनिधी नाशिक,

   अखिल भारतीय धनगर धर्म परिषदेचे तिसरे अधिवेशन चांदवड होळकर नगरीमध्ये होत आहे.अखिल भारतीय धनगर धर्म परिषद चे आयोजन

   नाशिक:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उत्तर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून चांदवड या नगरीची नियुक्ती केली आणि चांदवडला मोठा असा इतिहासल लाभला मल्हार होळकर यांनी चांदवडची संपूर्ण जबाबदारी ही यांच्याकडे दिली, चांदवड मध्ये ऐतिहासिक वास्तू रंगमहाल होळकर वाडा ही संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. चांदवडची रेणुका माता मंदिर हे द्वितीय तुकोजीराव होळकर यांनी नावारूपास आणले. विशेष आत्ताची चंद्रेश्वरी गड आणि पूर्वीचे मल्हारगड या ठिकाणी टाकसाळ म्हणून प्रसिद्ध असलेले चांदवडी रुपया ही टाकसाळ प्रसिद्ध होती गेले काही दिवसापासून चांदवड चा इतिहास हा उजेडात येत आहे,मागील वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत यशवंत राजे होळकर, तसेच ज्यांनी स्वराज्य उभे केले असे स्वराज्याचे शिलेदार या ठिकाणी मागील वर्षी भव्य दिव्य सोहळा होऊन चांदवड नगरी पुन्हा एकदा उजेडात आणली. संपूर्ण भारतभर या सोहळ्याचा गाजावाजा झाला आणि महाराष्ट्रातूनही इतर समाजसेवक चांदवडच्या दिशेने हा होळकर वाडा चांदवडला बघण्यासाठी येऊ लागले. याही वर्षी मोरे मौर्य क्रांती महासंघ च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी अखिल भारतीय धनगर धर्म परिषदेचे आयोजित आयोजन केले आहे.
     अखिल भारतीय धनगर धर्म परिषदेचे तिसरे अधिवेशन चांदवड होळकर नगरीमध्ये होत आहे त्यानिमित्त सर्व नाशिक जिल्ह्यातील होळकर प्रेमींनी उपस्थित राहून या परिषदेचे सोहळा भव्य दिव्य करावा असे आव्हान नासिक जिल्ह्याचे हिंदू धर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष समाधान भाऊ बागल यांनी केले आहे.
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई